![]() |
(दि.13,POL - कुणाल शेलार,मुरबाड)
गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवेच्या क्षेत्रात धगधगत्या कार्यात नावाजलेले असलेले देवा ग्रुप फाऊंडेशन (संघटना) चे जिल्हाध्यक्ष तथा समाजसेवक मनोज देसले यांच्या कार्याचा ठसा विकासपर्वाच्या पुस्तकात उमटला आहे.गोरगरिबांची असलेली जान आणि त्यांच्या हातून घडलेल्या विकासाच्या कामाची आकडेवारी केल्यास वहीचे पानेही कमी पडतील अशा समाजशील आणि माणूसकी झरी जपणारे ग्रामीण भागातून जिल्हयात विकास कार्यातून प्रसिध्द झालेले त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडके धडाडीचे आमदार श्री.किसनराव कथोरे यांचे अत्यंत निकटवर्तीय,कर्तृत्वाची सावली समजसेवक मनोज देसले आज गाव खेडे पाडयातील तरूण,वयोवृध्द,शेतकरी,आर्इ माऊलीसह तमाम बांधवांचे आधार म्हणून ओळखले जात आहे.
वाद वाढविण्यापेक्षा तो कसा मिटविला जार्इल अशी नैतिकतेची मनोधारणा त्यांच्या कौटूंबिक संस्कृतीतून मिळाली असून तो वारसा मनोज देसले यांनी अत्यंत जबाबदारीने व एकनिष्ठेने पुढे घेऊन जातांना दिसत आहेत.त्यांच्या विकासकामात त्यांच्या वार्डाचा चेहरा हा निसर्गरम्य झाला आहे.सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जात असताना कोण मोठं आणि कोण छोटं हे कधी पाहिले नाही त्यामुळेच त्यांना जनमाणसांत एक जिव्हाळी मानसन्मान मिळत आहे.कित्येक जणांचे जीव वाचविले,महिलांना रोजगार म्हणून स्वावलंबी करून त्यांना रोजगार यंत्रणा स्वखर्चात उपलब्ध करून अनेकांच्या घराची चूल पेटवली.
गावाच्या विकासाबरोबर शहराच्या विकासाला हातभार लावणारे मनोज देसले
मात्र आज गोरगरिबांच्या जीवनातील अविभाज्य हिस्सा बनले आहेत.तरूणांना मोलाचा सल्ला
देऊन चांगल्या मार्गावर नेण्यासाठी त्यांचे मार्गदर्शक महत्वाचे ठरले आहेत.सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य,क्रिडा व अन्य
क्षेत्रात कार्य बेभान असून आज मनोज देसले हे विकासपर्वाच्या त्या पुस्तकातील
चमकणारे पान म्हणून चर्चेत आले आहेत.
Post a Comment