(दि.15,POL - कुणाल शेलार,मुरबाड)
महाराष्ट्राचे लाडके तसेच धडाडीचे व विकासनिधीतील ढाण्या
वाघ म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे मुरबाड विधानसभेचे आमदार किसनराव कथोरे यांना
ठाणे जिल्हयातून मंत्री केव्हा करणार अशा चर्चा होत आहेत.मुरबाड विधानसभेसह इतर ठिकाणी ज्यांच्या
विकासकार्याचा डंका नेहमीच वाजत असतो,विकास कामांमध्ये ज्यांनी
केवळ आणि केवळ कामातून उत्तर दिले असे आमदार श्री.कथोरे हे
3 वेळा सलग आमदार म्हणून मोठया मताधिक्याने निवडून आले त्यांना आजही
मंत्रीपदापासून वंचित का ठेवले असा प्रश्न नागरिकांतून होत आहे.आमदार असताना विधानसभेचा विकास झाला तेच मंत्री झाल्यास विकासाची आकडेवारी
गणितात अधिकात मोजता येणार नाही हे मात्र निश्चितच असेल.जनता हिच खरी त्यांची ताकद असून त्यांच्याकडे आलेला लहान किंवा मोठा असा दुजाभाव
पाहायला आजपर्यंत मिळाला नाही.विकासपुरूष म्हणून त्यांच्याकडे
पाहिले जात असून कोकणात असणार्या ताकदीत आमदार किसनराव कथोरे
यांचे नावही घेतले जाते.सर्वांशी मैत्रीचे घनिष्ठ संबंध असल्याने
सर्वांशी माणूसकी झरी जपणारे आमदार श्री.कथोरे यांच्या समाजकार्यशील
कर्तृत्वातून जनतेचे कैवारी असल्याचे पाहायला मिळाले आहे.सर्व
धर्माच्या जनतेच्या मनात आमदार किसन कथोरे हे नाव असून ते पुसण्याची ताकद कोणामध्ये
नाही हे ज्यांना त्यांना ज्ञातच आहे.त्यांनी कधी समथर्काला जवळ
न घेता गरिबीत जगणार्या कुटूंबातील प्रत्येक सदस्याला जवळ घेऊन
त्यांना मायेची सावली देऊन आधारवड,वटवृक्ष म्हणून भूमिका साकारली
आहे.यावेळी त्यांची हॅट्रिक निश्चित असून
ही जनता बोलत असून आमदार किसनराव कथोरे यांना मंत्री न बनविल्याने त्याबाबतच खंत येथील
जनतेच्या मनात कायम राहिली आहे.त्यांना ठाणे जिल्हयातून मंत्री
केल्यास नक्की विकासाचे वादळ मुरबाड विधानसभेसारखे इतर सर्वत्र जोमाने वाहतील अशी मनोभावना
येथील नागरिक चाहत्यांनी व्यक्त केली आहे.
Post a Comment