दि,09,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
दरवर्षी प्रमाणे यंदाच्याही वर्षी विद्दयामंदीर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्दयालय शिवळे येथे इयत्ता 5 वी ते 10 विद्दयार्थ्यांची शिक्षक पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पालकांनी आपल्या पाल्याची व इतर समस्या अडचणीवर शिक्षकांशी सुसंवाद साधला.या पालकसभेला शिक्षकांनी विद्दयार्थ्यांच्या संरक्षणासंबंधी पालकांशी संवाद साधत बालकांचे लैंगिक शोषण मुक्तता व संरक्षण यांवर चर्चा केली.
बदलापूर प्रकरणानंतर अर्पण संस्थेने बालकांच्या संरक्षणाकडे लक्ष केंद्रित केले असून लहान मुलं मुली यांचे लैंगिक शोषण होत असल्याने यावर आळा घालण्याकरिता आपण कशा पध्दतीने सतर्क राहावे तसेच ज्या प्रकारे अज्ञात मुलांवर लैंगिक शोषण केले जाते त्याचा मुलांवर भावनिक,शारिरीक,मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने कधी कधी आत्महत्यासारखे प्रकारही घडतात यादृष्टिकोणातून अर्पण संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांना ट्रेनिंग देण्यात आले असता सदर माहिती प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षकांनी पालकांशी सुसंवाद साधून त्यांना दिली पाहिजे त्याचबरोबर काही ठिकाणी बालकं आपल्यावरील अत्याचार झाला असल्याने त्यांना कळत नाही त्यातून नैराश्य त्यांच्या मनात बसते असे होऊ नये म्हणून या पालकसभेतून शिक्षकांनी पालकांशी संवाद साधून पालकांनीही या बाबी घडु नये म्हणून निरीक्षण करून जादा लक्ष केंद्रित केले पाहिजे,आजचे युगात सोशल मिडीयवर अश्लिल चित्र प्रदर्शन प्रकारामुळे विद्दयार्थी भरकटतो त्यामुळे आपण मोबाईलचे प्रमाण कमी करणं म्हणजे त्यांचे भविष्य उज्ज्वलीकडे वाटचाल होईल.
शिक्षक शाळा महाविद्दयालयातून विद्दयार्थ्यांना शिस्त लावतात कारण हे विद्दयार्थी केवळ आमचे विद्दयार्थी नसून ती आमची सुध्दा मुलं आहेत त्यामुळे आम्ही देखील त्यांचे कुटूंब प्रमुख आहोत त्यामुळे आमच्यासह पालकांनीही त्यांच्याकडे लक्ष केंद्रित करून चांगल्या मुलांची संगती असावी ती संगत अभ्यासासाठी आणि त्यांच्या जीवनाला यशस्वी गरूडाची झेप घेणारी असावी याबाबतचे सुसंवाद विद्दयामंदीर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्दयालय शिवळेचे प्राचार्य श्री.यशवंत दामोदर धलपे सर यांनी पालकांशी साधून सहविचार शृंखलाची देवाण घेवाण म्हणून संबोधित केले आहे.
या पालकसभेला बालक सुरक्षा व लैंगिक शोषणावर ज्येष्ठ शिक्षक श्री.धनाजी दळवी सर,सौ.डी.डी.खापरे मॅडम यांनी पालकांशी संवाद साधून पॉस्को कायद्दयाची माहिती देत या कायद्दयाची सविस्तर माहिती देत घडणार्या घटनांचे विश्लेषण देत सतर्कतने कसे राहिलो पाहिजे,विद्दयार्थ्यांचे आपण कसे मित्र झालो पाहिजे की त्याने प्रथम कोणताही विषय असो तो तुम्हाला सांगितले पाहिजे अशा चांगल्या प्रकारे व मोलाचे मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपिठावर भास्कर जामघरे सर,शरद सोनावणे सर,पत्रकार कुणाल शेलार,संतोष सुरोशे सर,डी.एल.खापरे,एस.एम.थोरात सर,डी.एन.घोरड सर,ए.डी.विशे,व्हि.आर.मोहपे मॅडम, एन.एस.पारधी मॅडम,वारे मॅडम,निलेश गायकर सर,कैलास जाधव सर,संतोष चौधरी सर उपस्थित होते.या पालकसभेचे प्रास्ताविक श्री.एस.वाय.घोलप सर,सुत्रसंचालन श्री.एम.एम.गायकवाड सर यांनी केले आहे.
Post a Comment