BIG BREAKING NEWS...

कुडवली मधील अपोलो पाईप इंडस्ट्रीज कंपनीमध्ये पञ्यावरून पडल्याने 30 वर्षीय कामगाराचा मृत्यु ; ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये काही कामगारांचा मृत्यु झाल्यास त्याची नोंद मुरबाड तालुका आरोग्य विभागात नाही

 

(दि.03,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

मुरबाड अतिरिक्त औद्दयोगिक क्षेत्र कुडवली येथे एपीएल अपोलो इंडस्ट्रीज कंपनीमध्ये असंख्य कामगार काम करत असुन विविध कंपनीमध्ये काही कामगारांचे बळी गेले असल्याची चर्चा अनेक वेळा प्रसिध्दी माध्यम ते नाक्यावर झाली असता अपोलो पाईप इंडस्ट्रीज कंपनीमध्ये एका अजमगड उत्तरप्रदेश येथून पत्राशेड बसविण्याकरिता काही कामगार आणले होते त्या कामगारांपैकी आनंद ब्रिजेश पासवान नामक वय वर्षे 30 हा अचानक पत्राशेडचे काम करत असताना पाऊस सुरू झाले असता पञ्यावरून खाली पडला यामध्ये त्याला गंभीर दुखापतही झाली होती त्यातच त्याचा मृत्यु झाला.मिळालेल्या माहितीनुसार सदरचा कामगार या कंपनीचा स्थानिक कामगार नसल्याचे कळून येत असून सदरचा कामगार हा त्याच्या सहकार्‍यांनी मुरबाड ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेले.संबंधित स्थानिक ठेकेदार व सबठेकेदार यांच्यापैकी कोणीही तेथे नसल्याचे प्रथमदर्शनी चर्चेतून कळाले आहे.अर्थात या रूग्णालयात आनंदला घेऊन कोण आले व काठेे निघून गेले याबाबत अद्दयापतरी माहिती हाती लागली नसून आनंदला तेथे एकटे सोडून निघून गेल्याची माहिती मिळत आहे.अशातच आनंदचा मृतदेह तब्बल अडीच ते तीन तास रूग्णालयातच होता.सदरच्या घटनेची माहिती मिळताच मुरबाड पोलीस मुरबाड ग्रामीण रूग्णालयात गेले असता सदर घटनेची दखल घेतली परंतु घटनास्थळी कोणी नसल्याने फिर्याद कुणाची यावर वेळ मात्र लागून राहीला या मृत्युप्रकरणी मुरबाड मुरबाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या मृताला कशापध्दतीने न्याय मिळेल अशी चर्च नागरिकांमध्ये होत आहे.ही एकच कंपनी नाही तर मुरबाड एमआयडीसी हद्दीत सुध्दा मोठमोठया नामांकित कंपन्या असून स्थानिकांना प्राधान्य कमी दिले असता परप्रांतीयांना कंपनीत कामावर घेतले जातात.याच परप्रांतीयांचा अनेक वेळा जीवही गेलेला असून संबंधित ठेकेदार,मालक काही बडया छुप्या अदृश्य सावलीला मध्यस्थी आणून सदरचे प्रकरणे दाबण्याचा प्रयत्न करण्यात यशस्वी ठरले आहेत.नाव मोठे परंतु लक्षण खोटे अशांनी प्रकरणे दाबण्यासाठी अंतर्गत प्रयत्नही केले परंतु अशा घटना औद्दयोगिक क्षेत्रात घडल्या असतानांही कोणत्याही चालक,मालक,ठेकेदार यांना तात्काळ अटक केल्याची माहिती आमच्या कानावर तरीही आलेली नाही.येथील कामगाराची सुरक्षा वार्‍यावर असुन मृत्यु झाल्यास त्याची जबाबदारी कुणीही घेत नसल्याने सदरचे प्रकरण नव्याने भिजत घोंगडे राहून कालांतराने नजर दुरफेक होते त्यामुळे कंपनीवाले यांची मुजोरी वाढत असून येथील कामगारांचा मृत्यु म्हणजे नवीन बाब नाहीच अशी म्हणायची वेळ आज आलेली आहे.जे कामगार काम करतात त्यांचे ईएसआयसी संदर्भात चौकशी होणेही तितकेच गरजेचे आहे.काही ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये काही कामगारांचा मृत्यु झाल्यास त्याची नोंद मुरबाड तालुका आरोग्य विभागात होते की नाही किंवा किती व कशा कारणामुळे मृत्यु झाला याची माहिती अपुरीच हाती लागत आहे.जे कामगार काम करतात त्यांचे ईएसआयसी मध्ये नोंद असल्यास त्यांच्यावर उपचार काही हॉस्पिटल येथे होत असून त्या संदर्भातील चौकशी होणेही तितकेच महत्वाचे आहे.ईएसआयसी संदर्भाचा मुद्दा ही महत्वाचा असुन हॉस्पिटल बेड संख्या,काम करणार्‍या अनोंदनिकृत किंवा नोंदणीकृत एएनएम व जीएनएम सह ऑडीट व कंपनीमधील ऑडीटची चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरत असून कामगारांच्या सुरक्षेकडे डोळेझाक करणार्‍या व सदर घडलेल्या घटनेची कामगार आयुक्तांनी दखल घेऊन कंपनीवर कारवाई करावी अशीही मागणी करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post