(दि.30,POL
- कुणाल शेलार,मुरबाड)
पावसाचा जोर कायम असताना कल्याण मुरबाड बदलापूर व अनेक गाव पातळीवर नदी नाल्यांना पुर आले असता या पुरात नागरिकांसह वाहतुक प्रवासी यांचा प्रवास मार्ग थांबला होता.याची माहिती तात्काळ मिळताच याच जोरदार पावसात आमदार किसनराव कथोरे घटनास्थळी पाहणी करून नागरिकांच्या संरक्षणासाठी स्वतः भरपावसात उतरून नागरिकांना मदत केली आहे.
रायता पुलावरून पाणी,दहागाव पुलावरून पाणी,टिटवाळा मार्गावर पाणी अशातच प्रवाशांचे नाहक हाल होत असताना पर्यायी मार्ग काढून देण्यासाठी प्रशासनाशी संपर्कात राहून आपत्कालीन यंत्रणांना सुचना देऊन नागरिकांचे संरक्षण आमदार श्री.कथोरे यांनी केले आहे.संभाव्य आपत्ती लक्षात घेऊनच त्याला तोंड देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली होती.जिथं जिथं मदतीची अवश्यक्यता होती तिथं मदत पाहोचविण्यासाठी आमदार श्री.कथोरे यांनी ताकद लावली होती.
जनतेला माहिती आहे जिथं श्री.कथोरे ताकद लावतात तिथं ते यशस्वीच होतात आणि याच पावसाच्या झरीत कार्यसम्राट आमदार पुर परिस्थितीत भिजतांना दिसले आहेत.रेड,ऑरेंज,यल्लो अलर्ट असूनही आमदारांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे.काही सखल भागात पाणी साचल्याने नुकसान झाले असून यावर तात्काळ उपाययोजना आखण्यात आले.आमदार आपल्या दारी केवळ निवडणूकापुरता येत नसतो,प्रत्येकांच्या अडचणीतही हाच आमदार प्रथम उभा असतो आणि असा आमदार ठाणे जिल्हयाला श्री.कथोरे यांच्या रूपात लाभला हेच आमचे भाग्य असे नागरिकांनी आमच्याशी भावना व्यक्त करतांना सांगितले आहे.
तुफान कितीही आले तरी आमदार श्री.कथोरे यांनी मनाशी केलेल्या कराराची जिद्द कायम ठेवली आहे.लोकाभिमुख विकासपुरूष म्हणून त्यांची ओळख असून गोरगरिबांची छत्रसावली,आधारस्तंभ म्हणूनच जनता त्यांच्याकडे पाहते.या वेळी पुरपरिस्थितीची पाहणी करित असताना आमदार श्री.कथोरे यांनी मी माझ्यासह सर्व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच माझे जनसंपर्क कार्यालय सदैव आपल्या सेवेसी तत्पर असल्याचे पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे.
Post a Comment