दि,20,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड शहापूर दिशेने निघालेल्या एसटी महामंडळ बसचा कुडवली येथील आयटीआय शेजारी वळणावर दुपारी साधारणतः 12 ते साडेबारा दरम्यान अपघात झाला आहे.बसच्या समोरील टायरचा पाटाचे बेल्ट तुटल्याने स्टेरिंग ही लॉक झाली नंतर गाडी हळूहळू ही खडड्यात पडली असल्याचे बस चालक यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले.या अपघातात महिला पुरूष,लहान मुलं प्रवासी जखमी झाल्याने त्यांना मुरबाड ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असून घडलेल्या माहितीची कल्पना मिळताच ग्रामीण रूग्णालय मुरबाडचे नेत्रशल्यचिकित्सक तथा वैद्दयकीय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी सर्व डॉक्टर,परिचारिका,कर्मचारी स्टाफ यांना उपचार यंत्रणा कार्यान्वीत करण्यात आली होती.यावेळी अपघात प्रवासी यांना उपचाराकरिता आणले असता डॉ.संग्राम डांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्कालीन यंत्रणा अगोदरच गठीत केल्याने सर्व सदस्यांसह यंत्रणा सज्ज केली होती.
या बसमध्ये एकूण 70 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत असून ग्रामीण रूग्णालय मुरबाड येथे 35 रूग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले.यापैकी 32 रूग्ण हे किरकोळ जखमी झाले होते तर 3 रूग्णांचे एक्सरे करण्यात आले असता त्यांच्या रिपोर्टमधून मायनर फ्रॅक्श्चर असल्याची माहिती वैद्दयकीय अधिक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी आमच्याशी बोलतांना दिली.सदर झालेल्या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवीतहाणी झालेली नसून गंभीर रूग्ण या उपचारादरम्यान आढळून आलेला नसल्याचे सांगण्यात आले असून या दुखापत झालेल्या रूग्णांना इंजेक्शने,औषध,मलमपट्टी तसेच अवश्यक तपासण्या करण्यात आले.ज्या रूग्णांना त्रास होत होते त्यांना अंतररूग्ण म्हणून दाखल करून घेण्यात आले असून सदर घटनेबद्दल मुरबाड विधानसभेचे आमदार किसनराव कथोरे यांना फोनद्वारे सविस्तर माहिती देण्यात आली असता आमदार श्री.कथोरे यांनी सर्व प्रवाशांच्या काळजीची माहिती घेतली.या अपघाताविषयी ठाणे जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.कैलास पवार,मुरबाड तहसिलदार अभिजीत देशमुख यांनाही सदर माहिती कळविण्यात आली असल्याचे डॉ.संग्राम डांगे यांनी सांगितले.अपघातात दुखापत झालेल्या रूग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी ग्रामीण रूग्णालय आवारात आपल्या नातेवाईकांची विचारपुस करण्यासाठी धाव घेतली यावेळी मोठया प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली असून बस डेपोचे कर्मचारी यांना यावेळी एकच घेराव घालण्यात आले असल्याचे निदर्शनास आले.सदर अपघात झाल्यानंतर काही कालावधीने त्याच अपघाती बसला आग लागल्याचे प्रथमदर्शनी कळाले असून आग विझविण्यासाठी अग्निशमक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व आगीला नियंत्रणात आणण्याचे शौर्य दाखविले त्याचबरोबर पोलीस यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाल्याने मदतीसाठी कर्तव्यावर तत्पर असल्याचे पाहायला मिळाले.
Post a Comment