दि,28,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
ठाणे जिल्हयातील मुरबाड
तालुक्यातील कळमखांडे गावातील कष्टकरी शेतकरी श्री.मारूती विशे यांचे सुपुत्र भूमिपुत्र
संदेश मारूती विशे यांची मुंबई गृहरक्षकपदी निवड झाली आहे.याच गावातून 4 नवतरूण युवकांची
गृहरक्षकपदी निवड झाल्याचे समजत असुन त्यापैकी संदेश विशे हे एक आहेत. गेल्या अनेक
वर्षापासून संदेश विशे यांनी शेतकरी म्हणून परंपरा सांभाळली असून त्यांची मेहनत घामाच्या
धारेतून सर्वांनी पाहिली आहे.अतिशय मनमिळावू आणि संस्कार आदर्श अंगी बाळगणारे संदेश
विशे यांनी गृहरक्षकासाठी आपण प्रयत्न केली पाहिजे या यशस्वी दृष्टिकोणातून त्यांनी
आई वडील यांच्या आशिर्वादाने पाऊल टाकले आणि त्यांच्या आशिर्वादाचे फळ म्हणून त्यांनी
मुंबई गृहरक्षक पदासाठी फॉर्म भरले.जिद्दीसह चिकाटी मनाशी बांधून त्यांनी परिक्षा
उत्तीर्ण केले अन त्यात त्यांची विजयाची गगन भरारी घेत यश संपादन केले.गावातील होतकरू,गरिबीची
जाण असलेले भूमिपुत्र संदेश विशे यांची मुंबई गृहरक्षक पदी वर्णी लागल्याने तालुक्यासह
गावपातळीवर त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.संदेश विशे यांचा नेहमी हसरा चेहरा सर्वांच्या
मनात कौटूंबिक घर करून जाणारा असून त्यांचे पुढील कार्य त्यांच्या हातून धडाडीचे घडेल
या आशिर्वादासह कापडी परिवार तसेच पत्रकार मयुरी कुणाल शेलार(बहिण),संजना कापडी(बहिण),चंदना
कापडी(बहिण), यांसह सर्व ग्रामस्थ मंडळी यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Post a Comment