दि,25,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
गेल्या 3 दिवसापुर्वी
अंबरनाथ येथे बांधकाम उद्दयोजक विश्वनाथ पनवेलकर यांच्या कार्यालयाबाहेर 2 अज्ञात
इसमांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती.त्यानंतर अज्ञात इसमांनी गोळीबार करून पळ
काढला यावेळी पनवेलकर काही कारणास्थव हायकोर्टात होते.सदर घटनेची माहिती अंबरनाथ पोलीसांना
कळताच घटनास्थळी पोलीस हजर झाले व तपास यंत्रणा हाती घेतली परंतु या घडलेल्या घटनेत
विश्वनाथ पनवेलकर यांनी आमदार किसनराव कथोरे यांच्यावर खळबळजनक आरोप करून सदर प्रकार
घडवून आणल्याची प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीत दिली असून सदर वाद हा बदलापूर येथील चिंचवली
गावातील दगडखाणीवरून झाल्याचे पनवेलकर यांनी आपल्या प्रतिक्रियेतुन म्हंटले आहे.त्यातच
त्यांनी आमदार किसनराव कथोरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने आम्ही याबाबत आमदार किसनराव
कथोरे यांच्याशी संपर्क साधून सदर घटनेबाबत प्रतिक्रिया घेतली असता सदर घटनेशी माझा
काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले तसेच त्यांनी नाव घेतलं कि नाही याबाबत मला
कल्पना नसून चोराच्या मनात चांदणं असून काही तरी असेलच त्यांच्यामध्ये त्यामुळेच काहीतरी
घडले असेल ते,मी असले काही उपद्वाप करित नाही,ते मला जमत नाही आणि या गोष्टी माझ्या
आयुष्यात कळाल्या नाही,मी नेहमी विकासकामाकडे लक्ष वेधून घेत असल्याने गावाची भांडण
ज्यांनी मिटवली तो असे कृत्य घडवून कशासाठी आणेल असे म्हणत आमदार किसनराव कथोरे यांनी
पनवेलकर यांनी केलेल्या आरोपावर खंडण केलं आहे.
Post a Comment