(दि.27,POL - कुणाल शेलार,मुरबाड)
आजही शेतकर्यांना
जो न्याय तत्कालीन उपविभागीय अधिकारी कल्याणचे श्री.अभिजीत भांडे
पाटील यांच्या माध्यमातून मिळाला त्याचा विसर येथील सर्वसामान्य शेतकरी बांधवांसह नागरिकांना
पडलेला नाही.विविध गाव खेडेपाडयातील केलेल्या त्यांच्या प्रशासकीय
कार्यातून चांगल्या कौतूकी कामगिरीतून माणूसकीची झरी कशी असावी ही दाखवून दिली आहे.त्यांच्या कार्यक्षेत्रातील त्यांनी घेतलेला आढावा व निवडणूक निर्णय अधिकारी
म्हणून सांभाळलेली जबाबदारी त्यांनी चोखपणे सांभाळून कर्तव्यदक्ष म्हणून अधिकारी कसे
असावे हे सर्वांनी जवळून पाहिले आहे.त्यांची कामगिरी पाहून त्यांना
विविध असे पुरस्काराने सन्मानित केले असून राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार त्यांना प्रदान
करण्यात आले होते.अधिरी भूमिकेत दर्जेदार काम करत असताना सामाजिक
सलोखाने नैतिकतेची बांधिलकी जपणारे असे व्यक्तीमत्व शोधूनही सापडणार नाही अशा चर्चा
अनेकांच्या मुखातून आज निघत आहेत.त्यांच्या प्रशासकीय दालनात
सर्वसामान्य जनता त्यांच्या व्यथा गाथा घेऊन जात होते त्यावेळी त्यांची बाजू जाणून
घेत त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका सर्वांना भाऊन जात होती.त्यांच्या कालावधीतील मिळालेला न्याय त्यांची प्रत्येकाच्या मनात कौटूंबिक
घर निर्माण केले असल्याचे नागरिकांच्या मुखातून निघत आहे.त्यांच्या
प्रशासकीय दालनात शेतकर्यांना न्याय मिळाला तर काहींना जमिनीच्या
सुनावणीत खर्या अर्थाने समोर असलेल्या पुराव्यानुसार त्यांच्या
जमिनी परत मिळाल्या.जे सत्य ते सत्य अशी पारदर्शक भूमिका साकारणारे
तत्कालीन उपविभागीय अधिकारी कल्याणचे श्री.अभिजीत भांडे पाटील
यांच्या कर्तव्यपरायण,धाडसी व्यक्तीमत्वामुळेच येथील चर्चा असे
व्यक्तीमत्व शोधून सापडणार नाही असे आज म्हणत आहेत.
Post a Comment