दि,06,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
ठाणे जिल्ह्याचे दुभाजन होऊन कल्याण जिल्हा व्हावा यासाठी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण,मा.खासदार आनंद परांजपे,मुरबाड विधानसभेचे विद्दयमान आमदार किसनराव कथोरे यांनी पाठपुरावा केला होता आणि वेळोवेळी ठाणे जिल्हयाचे त्रिभाजन जिल्हे व्हावे म्हणून भूमिका साकारली होती महत्वाचे म्हणजे कल्याण जिल्हा व्हावा म्हणून आमदार किसनराव कथोरे हे जिल्हापरिषदेचे अध्यक्ष होते तेव्हापासूनची ही मागणी त्यांनी केली होती.आमदार श्री.कथोरे यांच्या मागणी विचार करता त्यावेळी राज्यशासनानी बिंगुळकर समिती कोकण आयुक्त होते त्यांच्या अथ्यक्षतेखाली समिती गठित केली त्यांनी सुध्दा तीन जिल्हे व्हावेत म्हणून अशाप्रकाराचे अहवाल शासनाला दिले परंतु शासनाला हा बोजा शक्य होणार नाही म्हणून त्यावेळी दोन जिल्हे केले एक म्हणजे पालघर जिल्हा आणि दुसरं म्हणजे ठाणे जिल्हा.कालांतराने विचार केला तर शहरीभाग हा ठाणे जिल्हयात वाढत असल्याने महानगरपालिकांसह नगपालिकेचा बोजा ग्रामीण भागाला वेगळया प्रकाराची दिशा मिळत असुन ग्रामीण भागातील नागरिकांना ठाणे जिल्हयाच्या मुख्य केंद्र ठाण्यात येतांना ठाण्यात खुप अडचणीला सामोरे जावे लागत आहे याचसाठी कल्याण जिल्हा व्हावा म्हणून माझी मागणी पहिल्यापासूनची असून हिच मागणी आमदार श्री.कथोरे यांनी धरून ठेवल्याने राज्याला ठाणे जिल्हा नेतृत्व देत असल्याने कल्याण जिल्हा स्वतंत्र झाल्यास कल्याण जिल्हाही नेतृत्व देईल या अग्रही मागणीसह माझा पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार श्री.कथोरे यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.
ठाणे जिल्हयातून स्वंत्रत करून दुभाजन म्हणून कल्याण जिल्हा व्हावा म्हणून गेल्या 1 वर्षापूर्वीही मी ठराव मांडला असून मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या मागणीवर लक्ष केंद्रित केले असून कोणत्याही परिस्थितीत आपण कल्याण जिल्हा करू असे आश्वासन दिले आहे.याबाबत आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठपुरावा सुरू केले असल्याने आम्ही कल्याण जिल्हा स्वतंत्र केल्याशिवाय गप्प बसणार नाही अशी प्रतिक्रियाही आमच्याशी बोलतांना आमदार किसनराव कथोरे यांनी दिली आहे.या कल्याण जिल्हा विभाजनाचा विचार केल्यास यामध्ये 18 विधानसभा मतदार संघ येतात आणि कर्जत तालुका अलिबाग जोडला असल्याने कर्जत तालुक्याला कल्याण जवळ असल्याने कर्जत, अंबरनाथ,उल्हासनगर, मुरबाड,शहापूर, भिवंडी,कल्याण या तालुक्यांचा त्यामध्ये समावेश व्हावा म्हणून माझी अग्रही मागणी असल्याने कल्याण जिल्हाही भौगोलिकरित्या विकसित होर्इल आणि ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळून नागरिकांना सोयीसुविधा चांगल्याप्रकारे उपलब्ध होतील आणि त्यातच कल्याण रेल्वेला जोडल्यामुळे सर्वांच्या दृष्टिने महत्वाचे ठिकाण होऊ शकेल त्यातच शहरी भागातील वाढत्या इमारतीमुळे त्यांच्या कामासाठी बिल्डरवर्ग विकासक यांना नेहमीच जिल्हयाच्या ठिकाणी जावे लागते आणि ग्रामीण भागातील आमचा माणूस जातो त्याच्या कामाला कुठेतरी दुजाभाव होतो,अन्याय होतो त्यामुळे माझ्या ग्रामीण भागातील जनतेला न्याय मिळावा अन्याय होऊ नये म्हणून हा कल्याण जिल्हा व्हावा यासाठी मी गेले 10 वर्ष झाले पाठपुरावा करत आहे आणि जोपर्यंत ठाणे जिल्हयातून दुभाजन होऊन कल्याण जिल्हा होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही असेही महाराष्ट्राच्या इतिहासातील सलग 5 वेळा निवडुण आलेले मुरबाड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.
Post a Comment