दि,17,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
मुरबाड तालुक्यात मोठया
प्रमाणात वाळू,रेती,माती,उत्खनन करून रॉयल्टी चोरी होण्याचे प्रकार घडत असून गेल्या
काही दिवसांपूर्वी याबाबत बातमीही प्रसिध्द झाली होती.मुरबाड जवळील माळशेज घाटात अपघात
प्रमाण कमी होण्यासाठी आरटीओ ची गरज जास्त प्रमाणात हवी असताना आरटीओ मनमानी प्रमाणे
गावखेडयाच्या आड आपली गाडी थांबवून हम करे सो कायदा मानून दुचाकी चालकांना आपल्या सरकारी
कॅमेरात कैद करून दंडात्मक कारवाई करतांना दिसत आहेत.मुरबाड तालुका ग्रामीण भागाचा
असून कल्याण सारख्या शहरात दंडात्मक कारवाईचा बडगा न उचलता ग्रामीण भागाच्या नागरिकांचे
खिसे खाली करण्याचा महाप्रताप कारनाम करत आहेत.कायदा व दंड ग्रामीण भागात आकारून नागरिकांच्या
खिशाला चाप बसविण्याचा मनसुब प्रकार घडत आहे.ग्रामीण भागात नियमाचे पालन करत नसल्याने
झाडाच्या पडद्दयाआड गाडी लावून फोटो काढून त्यांना दंड ठोठाऊन 2 दिवस गायब होतात परंतु
कल्याण तालुक्यात कधी याच गाडया दंड ठोठावण्यासाठी आपले कर्तव्य बजावत नाहीत.मागे काही
महिण्यापूर्वी काल्यापिल्या गाडया एक्सपायर झाल्या होत्या त्यांच्यावर कारवाई झाली
कालांतराने याच गाडया चालू झाल्या त्यावेळी आरटीओ गायब झाली नंतर पुन्हा कारवाई सुरू
झाल्या आणि काल्यापिल्या गाडया गायब झाल्या त्यामुळे मध्यस्थी हप्तेगिरीचा संशय चर्चेला
आता होता त्यातच आत आरटीओ ने मुरबाड माळशेज रोड वरील खाटेघर येथे कॅमेरेची गाडी लावून
ग्रामीण भागातील नागरिकांवर दंडाची भर लादली असून येथील गरिब गरजू नागरिकाला घाईने
कधी हॉस्पिटल,कामावर,कोणत्याही अत्यंत कारनास्तव शहराकडे जात असताना हेल्मेट न बाळगल्याचे
दिसल्यास आयएनडी प्लेटवरील गाडी क्रमांकाचे फोटो काढून त्यावर कारवाई केली जाते.मुळातः
खाटेघर अलीकडीलच्या ठिकाणापासुन मुरबाडकडे जाताना शिरोसेपाडा या पट्टयात तर स्पिड बोर्ड
फलकच नाही मग हायस्पिडचे फलक नसताना किती जणांवर हायस्पिडची कारवाई झाली या प्रश्नाला
उत्तर मिळावं त्यातच प्रमुख म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक तसेच पोलीस उपनिरीक्षक यावेळी
हजर नसल्याने मनाला येईल त्यांच्या गाडयावर दंडात्मक कारवाई केली जाते.पोलीस प्रशासन
नेहमी पत्रकारांना आपले दुश्मन समजत असल्याने एका पत्रकारावरच दंडात्मक कारवाई करून
वर्दीची ताकद दाखविली आहे.पत्रकार हा आपल्या कर्तव्यवार काम करत असताना त्यानी वेळेअभावी
हेल्मेट न बाळगल्याने आरटीओ दंडात्मक कारवाई करते मग याच आरटीओ अधिकारी महोदयांनी
त्यांच्याच पोलीस प्रशासनाच्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर आजपर्यंत किती दंडात्मक
कारवाई नियम न बाळगल्याने केली याचा खुलासा करावा असे आवाहन एका पत्रकारानी केले
आहे.जिथं खरी गरज आहे तिथं आरटीओ आपले कर्तव्य बजावत नसताना ग्रामीण भागातील जनतेला
दंडात्मक कारवाई करण्याचे कर्तव्यच त्यांनी स्विकारले आहेत का असा प्रश्न आता विचारले
जात आहे.मुरबाड ग्रामीण भागात पोलीस अधिकारी हे विना हेल्मेट गाडी चालवतात ते त्यांना
दिसत नाहीत परंतु सर्वसामान्य नागरिक आणि दुश्मन समजणारे पत्रकार दिसतात हा नियम प्रथम
त्यांनी समजूनच कारवाई करावी अशी ओरड आता होऊ लागली आहे.शहर सोडून ग्रामीण भागातील
नागरिकांवर कारवाई करतांना ग्रामीण भागात येणारा गुटखा हे आरटीओ कडून का बंद झालेला
नाही,हा गुटखा मुरबाडमध्ये कोणत्या मार्गाने आणि गाडीने येतो त्या कर्तव्याला कसूर
होतात हा प्रश्न गंभीर असून 40,60,80 स्पिडवर गाडी चालवावी याचे फलक अथवा स्पिड बोर्ड
लिमीट रोडलगत नसल्याने आरटीओ हायस्पीड म्हणून दंड कसे मारतात,त्यांना कसे कळते की गाडी
ओवर स्पिड आहे? हा प्रश्न मुरबाडकरांना पडला असून यामध्येच हम करे सो कायदा आहे त्यामुळे
आरटीओ ला त्यांचे नियमच नेमकी काय आहेत हे माहिती नसून याकडे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री
तथा गृहमंत्री मा.देवेंद्र फडणवीस आपण याकडे लक्ष वेधून कोणत्या आधारावर गाडया स्पिड
आहेत आणि त्यांच्यावर कोणत्या आधारावर दंडात्मक कारवाई करतात हा प्रश्न विचारून
त्याचा खुलासा करून संबंधित पोलीस अधिकारी यांच्यावर बेकायदेशिर दंड वसुली प्रकरणी
तात्काळ कारवाई करून नियमाचे उल्लंघन केले प्रकरणी गुन्हा दाखल करावा अन्यथा येणार्या
15 दिवसांत मंत्रालयाच्या दालनासमोर आमरण उपोषण छेडला जाईल असा इशारा पत्रकार कुणाल
शेलार यांनी दिला आहे.
Post a Comment