(दि.19,POL - मुरबाड)
काही महिण्यांपूर्वी मुरबाड तहसिलदार व मुरबाड शहर मंडळ अधिकारी यांचे
कार्यालयात तालुक्यातील तलाठी तसेच मंडळ अधिकारी यांनी सजेवर न जाता मुरबाडच्या
शासकीय कार्यालयात थान मांडून बसले होते.ज्यांनी त्यांनी त्या त्या गावातील
असलेल्या सजेवर जाऊन कामकाज करणे असताना वारंवार सुचना वरिष्ठांकडून देण्यात आले
होते परंतु त्या सुचनांचे पालन संबंधित मंडळाधिकारी व तलाठी यांनी त्या
वरिष्ठांच्या सुचनांना केराची टोपली दाखविली होती.कोणत्याही सुचना न जुमानता हम
करे सो कायदा या भूमिकेतून टेबला खालची कामे करण्यासाठी तत्परता होती.यावेळी
मुरबाड तलाठी चावडी व मुरबाड तहसिलदार कार्यालयात तालुक्यातील तलाठयांनी व मंडळ
अधिकारी यांनी एक प्रकारे खुर्ची टेबल शाळाच भरविली होती.तालुक्यातील तलाठी व
मंडळाधिकारी यांच्या सजा असताना मुरबाड तहसिल कार्यालयाकडील पायीवाट धरली याचा
परिणाम म्हणून त्या गावातील विद्दयार्थ्यांना तसेच नागरिकांवर झालेला पाहायला
मिळाला.उत्पन्न दाखले,योजनेच्या संदर्भातील लागणार्या महत्वपूर्ण कागदावर अधिकृत
सही शिक्का व अन्य नागरिकांच्या सातबारा व फेरफार संबंधीच्या कामाकरिता शालेय
विद्दयार्थी व नागरिकांना मुरबाड तहसिल कार्यालय व मुरबाड तलाठी चावडी येथे
फेरफटका माराव्या लागत असे त्यामुळे त्यांच्या कामाला दिरंगार्इ होते.माळशेज
घाटाखाली गावांच्या तलाठी सजा सोडून तलाठी व मंडळाधिकारी यांच्या मनमानीमुळेच
नागरिकांना तेथून थेट मुरबाडमध्ये कामाकरिता यावे लागत होते त्यावेळी सदरच्या
तक्रारी या पत्रकार कुणाल शेलार यांच्याकडे आल्याने सविस्तर माहिती घेऊन तत्कालीन
ठाणे जिल्हाधिकारी श्री.राजेश नार्वेकर यांच्याशी भेट घेऊन सुरू असलेल्या
प्रकाराची माहिती देत निवेदन देऊन पत्रव्यवहार केला होता.यावेळी तत्कालीन ठाणे
जिल्हाधिकारी श्री.राजेश नार्वेकर यांनी सदर विषयाची तत्काळ गांभिर्याने दखल घेऊन
आदेश काढून त्या त्या सजेवर तलाठी व मंडळाधिकारी यांनी काम पाहावे असे सुचित केले
होते.तेव्हा तलाठी व मंडळाधिकारी यांनी त्यांच्या गावातील सजेचा मार्ग धरला होता
परंतु तिच परिस्थिती आज पुन्हा उदभवल्याने पुन्हा नागरिकांच्या समस्या व
मुरबाडच्या दिशेच्या पायीवाटेचे तलाठी मंडळाधिकारी ठरत असल्याचे निदर्शनास आले
आहे.मुरबाडचे धडाकेबाज व निर्भिड तहसिलदार श्री.संदीप आवारी यांनाही सदर बाब
निदर्शनास आल्याने त्यांनी सुचना दिल्याने तलाठी व मंडळाधिकारी यांनी मुरबाड
शहराच्या चावडीमध्ये आपला टेबल आणि खुर्ची हलविली आहे.कोणतेही आदेश नसताना मनमानी
पध्दतीचे नुकसान सर्वसामान्य जनतेला होत आहे.जनतेला होत असलेल्या नाहक त्रासमुळे
येथील माजी लोकप्रतिनिधी यांच्याही ही बाब निदर्शनास आली असल्याचे कळून येत आहे.
काही महिण्यांपूर्वी मुरबाड तहसिल कार्यालयात लाचलुचपत
विभागाने धाड टाकली असताना झालेला प्रकार सर्वांना ज्ञात आहे. ऑनलार्इनच्या कामाला
नेटवर्क नसल्याचा बहाणा हा केला जात असल्याचे बोलले जात असून मुळ कारण काय हे
मात्र गुलदस्त्यातच आहे.मुरबाड मध्ये मुरबाड मंडळ अधिकारी कार्यालय असुन तलाठी
कार्यालयांतर्गत मुरबाड,कुडवली,किशोर,धानिवली, करवेळे, घोरले, मासले,कोलठण,पवाळे ही गावे येत असून यापलीकडे इतर गावाचे तलाठी व
मंडळाधिकारी खुर्ची टेबल टाकून काम करतांना दिसत असल्याने याकडे ठाणे जिल्हाधिकारी
श्री.अशोक शिनगारे,मुरबाड तहसिलदार श्री.संदीप आवारी यांनी लक्ष वेधून ज्या
ज्या तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या सजा आहेत तेथे जाऊन काम करावे व मुरबाड चावडीत
केवळ मुरबाड मंडळ अधिकारी यांच्या अधिपत्याखालील असलेले तलाठी यांनीच काम करावे
अशा लेखी सुचना देण्यात यावे अशी मागणी पत्रकार कुणाल शेलार यांनी पुन्हा केली
आहे.या संदर्भात लवकरच निवेदन देऊन पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे पत्रकार
श्री.शेलार यांनी यावेळी बोलतांना सांगितले आहे.
Post a Comment