(दि.13,POL - कुणाल शेलार,मुरबाड)
आज लाखो करोडे शेतकरी
बांधवांना पीएम किसान सम्मान योजनेंतर्गत वर्षाला केंद्र सरकारकडून 6 हजार रूपये देऊन आर्थिक मदत देण्यात येते.याच योजनेंतर्गत
अजब गजब प्रकार आता समोर आला आहे.अपंग शेतकरी याचे खाते नजरचूकीने बंद (सरेंडर)
झाले असल्याने त्यांच्या अर्जाला व तक्रारीला केराची टोपली दाखविल्याने थेट
उपोषणाचा इशाराच दिला आहे.
ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यातील कळमखांडे या गावाचे
ग्रामीण भागात लकव्याने ग्रस्त तसेच कॅन्सर आजारातून बाहेर आलेले अपंग शेतकरी विजय
पांडूरंग कापडी यांना पीएम किसान सम्मान योजनेंतर्गत वर्षाला केंद्र सरकारकडून 6 हजार रूपये मिळत होते.परंतु लहान मुलाच्या नजरचूकीने
त्यांचे त्यांचे पीएम किसान सम्मान खाते बंद (सरेंडर) झाले.त्यांचे जवळचे व्यक्ती
यांना आर्थिक मदत मिळत असल्याने मला रक्कम का पडत नाही त्यावेळी त्यांना याबाबत
जानकर व्यक्तीने असा प्रकार झाला असल्याचे सांगितले.तेव्हा संबंधित केंद्रापासून
ते महाराष्ट्र राज्यातील जिल्हापातळीवर त्याचबरोबर तालुका पातळीवर त्याचबरोबर
ऑनलार्इन तक्रार,अर्ज करून सदर चूकी झाली असून मला पीएम किसान सम्मान योजनेंतर्गत वर्षाला
केंद्र सरकारकडून 6 हजार रूपये मिळवून देण्यासाठी विनंती केली.त्यावर अपयशी उत्तरे मिळालीत.घराची
आर्थिक परिस्थिती नाजूक त्यात अपंगग्रस्त शेतकरी सोबत वाढती महागाइ,मुलांचे शिक्षण यासह आजारांनी ग्रासलेले असे असताना
शासनाकडून शेतकर्यांना मिळणारी 6 हजाराची मदत यातून घराला हातभार लागत होता परंतु याकडे
पाठपुरावा करूनही संबंधित विभागाने हात वर करून मला शासनाच्या मिळणार्या या
योजनेपासून लांब ठेवले असल्याचे सांगत मार्गदर्शन करण्यासाठी व योजनेला लाभ
लाभार्थी म्हणून पुन्हा यादीत नोंद करून घेण्यासाठी पुढार घेत नसल्याने मला
मंत्रालयातूनच योग्य तो न्याय मिळेल या नैतिकतेतून दि.25/06/2024 रोजी मंत्रालयाच्या दालनासमोरच आमरण उपोषण करून न्याय
मिळविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणार असल्याचे श्री.कापडी यांनी सांगितले.अपंग व
कॅन्सरने ग्रस्त व्यक्तीची तक्रार पायदळी तुडविली जात आहे त्यामुळे थेट
मंत्रालयाच्या आज उपोषणाला बसण्याची अशी वेळेची परिस्थिती निर्माण झाली आहे.चूकीला
माफी नसते परंतु शासकीय परिपत्रकात रिव्होकमध्ये चूकीने अपात्रांना पात्र करण्याची
तरतूद असताना वरिष्ठ अधिकारी सरेंडरच्या नावाने त्यांच्या अर्जाला व तक्रारीला
अपयशी ठरवित आहेत.यावर सक्षम अधिकारी म्हणून मंत्रालयातून न्याय नक्की मिळणार या
भावनेतून कळमखांडेतील अपंग व कॅन्सरपिडीत व्यक्ती विजय पांडुरंग कापडी हे
मंत्रालयाच्या दालनासमोरच आमरण उपोषणाला बसणार असल्याचा आगळा वेगळा इशाराच प्रथमच
पीएम किसान सम्मान योजनेच्या प्रकरणातून समोर आले आहे.सदर उपोषणाचे पत्र
मंत्रालयासह इतर विभाग अधिकारी यांना पाठविले असून आता याकडे संबंधित यंत्रणा कशा
पध्दतीने लक्ष घालून त्यांचे खाते चालू करून त्यांना पुन्हा लाभार्थी बनविते की
अपंग कॅन्सरपिडीत विजय पांडूरंग कापडी या शेतकर्याला मंत्रालयासमोरील उपोषणाला
बसविण्यास भाग पाडते हे पाहावे लागेल.(क्रमशः)
Post a Comment