BIG BREAKING NEWS...

मी कोकण पद्वीधराचा उमेदवार म्हणून ग्रामीण भागातुन निवडणूक लढविण्यासाठी सज्ज - कुणाल शेलार

 

(दि.28,POL - संजना कापडी, मुरबाड)

निवडणूकीत आश्वासन देऊन फसवेगिरी करणारे उभे राहून थापा मारतात त्यामुळे आपणच आपल्या सुशिक्षीतांसाठी विधानसभेत जाऊन त्यांच्यासाठी काही तरी करायला हवंय या नैतिकतेतून आता आपणच पुढे येऊन या भूमिकेतून ते जर खोटे बोलून रेटून येतात तर मग आपण खरं बोलून काहीतरी करण्यासाठी का पुढे येऊ नये यातच आपण कसे काय मागे राहणार म्हणुन मी सुध्दा कोकण पद्वीधर म्हणून अपक्षातून मुरबाडच्या ग्रामीण भागातुन उमेदवारी म्हणून तयारी करतोय आणि त्याकरिता मी आता सज्जही झालो असल्याचे कुणाल शेलार यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.लोकशाहीमध्ये सर्वांना आपले स्वतंत्र स्वातंत्र असल्याने मी देखील या लोकशाहीचा भाग आहे आणि घटनेने दिलेल्या अधिकारातून मला देखील माझ्या सुशिक्षीत व्यक्ती,युवकांसाठी काही तरी करायचंय म्हणूनच तर मला कोकण पद्वीधर निवडणूक लढवायची आहे.त्याचबरोबर देशात सत्ता कोणाची यापेक्षा माझ्या मतदार संघातील सुशिक्षीत बेरोजगारांच्या समस्या सोडविण्यास मी किती यशस्वी झालो आणि किती अपयशी ठरलो याचे मला स्वतःलाच आत्मपरिक्षण करणारी हीच ती वेळ म्हणजे कोकण पद्वीधराचा उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झालो आहे.ज्यांना निवडून दिले ते कधी फिरकले नाही,नेता निवडुन गेला तेव्हा निवडणूक वेळी तो मी जनतेचा आहे असे म्हणतो आणि निवडुन गेल्यावर पक्षाचा नेत्याचा आदेश मानतो त्यातुनच नक्की कोणाचा सर्वांगिण विकास झाला अशी ओरड होऊ लागली.त्याला पर्याय म्हणुन मी आपल्या हक्काचा मानकरी म्हणून व आपला विश्वास म्हणून नवा चेहरा आपल्या समोर उभा आहे आणि मी ठाणे जिल्हयाच्या मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागातुन निवडणूक लढविणार असल्याचे पुन्हा घोषित करित आहे.मला गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवीतुन गोरगरिबांची जाण आहे त्यांच्यासाठी शासकीय दालनातुन न्याय मिळवून देण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न सर्वांनी जाणला असून त्यात आमच्या सुशिक्षीत बेरोजगारांच्या युवक युवतींचा वाढलेला आकडा हा कोणत्या दिशेकडे जात आहे याची खातरजमा कळून येत आहे त्यामुळे आता त्यांच्याकरिता काही तरी करून दाखविण्यासाठी निवडणूकीची संधीच युवकांनी उभे राहण्यासाठीची इच्छा प्रकट केल्याने त्यांच्या इच्छेखातीर ही कोकण पद्वीधराची निवडणूक मी लढविण्यासाठी सज्ज झालो असल्याचे कुणाल शेलार यांनी सांगितले आहे.वेळ भरपूर जरी असला तरी तयारी आजपासूनच त्यांनी सुरू केली आहे.त्यांच्या पाठिशी नवयुवकांचा मोठ पाठबळ असल्याने त्यांना मानणारा जनसमुदायाची ताकद सागराच्या समुद्रा इतकी असल्याने त्यांच्या पाठीशी माझ्यासह सर्वच युवक शेवटच्या क्षणापर्यंत उभेच राहणार असल्याचे मत अॅड.किरण थोरात यांनी यावेळी मांडले आहे.

 

Post a Comment

Previous Post Next Post