BIG BREAKING NEWS...

मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याने खामुंडी गावात जल्लोष

(दि.28, POL, कैलास बोडके, जुन्नर/नगर)

अंतरावली सराटी येथे आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील व समस्त समाज बांधव यांनी मागील सात महिन्यांपासून जो लढा उभारला होता त्याला अखेर यश मिळाले आहे.अखेर शनिवारी राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून त्याचे अध्यादेशही काढण्यात आला असून तो मनोज जरांगे यांना देण्यात आला आहे . ही घोषणा करताच समाज बांधवांनी ठीक ठिकाणी मोठा जल्लोष केला आहे . घोषणने नंतर मराठा समाजाच्या आनंदाला उधाण आले असून खामुंडी (ता. जुन्नर )येथील सकल मराठा बांधवांनी विवीध प्रकारे आनंद साजरा केला आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे  गेले अनेक महिन्यापासून संघर्ष करीत असून सरकारने मराठ्यांना आरक्षण द्यावे यासाठी मुंबईत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला होता. त्यानंतर मुंबईच्या दिशेने जात असताना वाशी येथे आंदोलन सुरू असताना राज्य शासनाने त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत आरक्षण बाबत निर्णय घेत अध्यादेश काढले असून मराठा आरक्षणाबाबत यश मिळाल्याने

मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला आहे. राज्यभरात मराठा बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यात पार्श्वभूमी खामुंडी गावात मराठा बांधवांनी एकत्रित येत फटाके फोडत आनंद व्यक्त करत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची गावातून पारंपारिक वाद्यामध्ये मिरवणूक काढून   एकमेकांना पेढे भरविण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा प्रकारच्या घोषणा देखील देण्यात आल्या.मराठा समाज व जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळाले असून मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचे मार्ग मोकळे झाले असल्याने समाजातील तरुणांचे नोकरीचे, शिक्षणाचे प्रश्न मार्गी लागणार असल्याने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते .

Post a Comment

Previous Post Next Post