(दि.15,POL - कुणाल शेलार,मुरबाड)
प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतून लाभार्थी यांची निवड
करून त्यांना घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य मदत करित असून ग्रामीण भागात घरकुल योजनेंतर्गत
घराचे बांधकाम शासकीय नियमाप्रमाणे करण्याची सुरूवात केली.परंतु सुरूवातीचे दोन हप्ते पडले असताना
तिसरा हप्ता लाभार्थीपर्यंत निधी उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या खात्यात जमा झाले नसल्याचे
कळून येत आहे.1 लाख 35 हजारात घर होत नाही
हे सर्वांनाच माहिती असून घरबांधकाम करतांना उसणे पासणे पैसे घेऊन कर्ज घेऊन आपल्या
घराला केंद्र सरकाराची मदतही मिळत असल्याने नागरिकांनी आभार तर मानलेच परंतु काही लाभार्थींची
परिस्थिती कमकुवत असल्याने तसेच तुटपुंजी त्यांच्याकडील रक्कम अधिक केंद्र शासनाचे
दोन हप्ते अशा रक्कमेत अर्धे घर बांधण्यात आले असल्याचे काही ठिकाणी दिसून येत आहे.
प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतून ज्या लाभर्थींना या योजनेचा लाभ मिळत
आहे त्यामध्ये तिसरा हप्त्याचा निधी उपलब्ध नसल्याने पावसाळयातही बांधकाम झालेले घरे
पत्रे विना ओसाड पडले आहेत.त्यातच लाभार्थी यांच्याकडून सत्यप्रतिज्ञापत्र
घेऊन जून अखेर घराचे बांधकाम पूर्ण करावे असे लेखी लिहून घेतले असून तिसरा हप्त्याचा
निधी नसल्याने पावसाळयात घरकूल पूर्ण कसे होतील असा प्रश्न लाभार्थीला
पडला आहे.अधिकारी,इंजिनियर यांचे काम चोखपणे
व पारदर्शकपणाचे असून त्यांचे लाभार्थींना हप्ते मिळवून देण्यास मोलाचे सहकार्य लाभत
आहेत.भर पावसात इतर ठिकाणी स्थलांतर झाले कुटूंब परिवार आपला
घर पैसे नसल्याअभावी अर्धे राहिले असून आता जर सरकारचा हप्ता भेटला असता तर आपल्या
स्वःघरात गृहप्रवेश केला असता अशा भावना व्यक्त करतांना दिसले असून प्रधानमंत्री घरकुल
आवास योजनेचे निधी लवकरच सरकारने देऊन आम्हास आमचे घरकूल पुर्ण करण्यासाठी मदत करावी
अशी मागणी लाभार्थी व त्यांचे कुटूंबाकडून होत आहे.
Post a Comment