(दि.31,POL
- कुणाल शेलार,मुरबाड)
ठाणे जिल्हयातील
मुरबाड विधानसभेचे धडाडीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांच्या हॅट्रीक
आमदारकीमध्ये विकासकार्यात कायापालट झालेला आहे.जलदगतीने होणारा विकास आणि
जनतेची ताकद बनलेल्या आमदार श्री.कथोरे यांनी इतिहासात सुवर्ण
अक्षरात नोंद होर्इल अशी कामे केली आहेत.येथील जनता सुखी असून
आमदारांना सुखी प्रजा आणि न्यायी राजा अशी उपमाच दिली आहे.जनतेच्या
मनात कौटूंबिक सदस्याची जागा आमदार श्री.कथोरे यांना मिळाली असून
गरिबांची सावली तसेच वटवृक्ष म्हणून आधारछत्र म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.सदैव नागरिकांसाठी तत्पर असलेले एकमेव आमदार जे कधीही नॉटरिचेबल झालेले नाही.अनेकांच्या मुलींचे बाप म्हणून कन्यादान केले,निराधारांना
आधार दिले,केवळ विधानसभेतच नव्हे तर संपुर्ण राज्यात त्यांच्या
कर्तृत्वाचा डंका वाजत आहे असे महाराष्ट्राचे लाडके आमदार किसनराव कथोरे यांनी कधी
दुजाभाव केला नाही.आरोप प्रत्यारोपाचा त्यांच्यावर कधीही परिणाम
झाला नाही कारण त्यांनी त्याकडे लक्ष न वेधता केवळ आणि केवळ विकास करण्याचा निश्चय मनाशी बाळगला असल्याने एकदा दिलेला शब्द पुर्ण करण्यासाठी शक्ती सर्वांच्या
निदर्शनास येते याचेच ज्वलंत उदाहरण सर्वांना ज्ञात आहे.अनेकांनी
खेळ मांडला जरी असला तरी त्या खेळाचे अंपायरच आमदार श्री.कथोरे
आहेत अशी चर्चा नागरिकांमध्ये सध्या होत आहे.मुंबर्इहून पर्यटनस्थळी
मुरबाड विधानसभेत आलेल्या पर्यटकांनाही येथील विकास कामांच्या कार्याचा आश्चर्य वाटला आहे.काही पर्यटकांनी हा विकास झाला म्हणजे
तुमचे आमदार किसन कथोरे आहेत का असे त्यांच्या मुखातुन एैकायला मिळत आहे त्यामुळे विकासाचा
बादशहा आणि मुरबाड विधानसभेचे ढाण्या वाघ म्हणुन त्यांची ओळख आज सर्वत्र गाजली आहे.
आगामी निवडणूका
समोर असताना मी निवडणूकाकडे अद्दयापही लक्ष वेधले नाही तर माझे केवळ विकासाकडे लक्ष
आहे असे आमदार श्री.कथोरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले आहे.मुरबाड
विधानसभा म्हणजे आमदार श्री.कथोरे यांचा विश्वासू असलेला मजबुतीचा बालेकिल्ला.या बालेकिल्ल्यावर तोफेचा
वार जरी आला तरी त्याचा फुसका बार होर्इल हे मात्र निश्चित.
मुरबाड
विधानसभेतुन आमदार श्री.कथोरे यांना मागच्या निवडणूकीत मताधिक्याची आकडेवारी पाहिली तर ते महाराष्ट्रात
तिसरे क्रमांकावर सर्वाधिक मते घेणारे आमदार ठरले.आजही त्यांच्या
मतांवर कोणताही परिणाम झालेला दिसून येत नाही कारण दिवसेंदिवस त्यांचे जनता दरबारात
नागरिकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.आगामी विधानसभेच्या निवडणूकीचे
बिगुल जरी वाजले असले तरी आमदार श्री.किसन कथोरे यांना पराभूत
केले जाणार नाही तर जे श्री.कथोरे यांच्या विरोधात उभे राहतील
ते पराभूत होतील असे येथील जनतेच्या प्रतिक्रियातुन समोर आले आहे.मुरबाड विधानसभेवर अनेकांनी जरी दावा करित असले तरी आमदार श्री.कथोरे 3 वेळा हॅट्रिक मारून निवडून आलेत याचे विसर पडता
कामा नये.काल माळशेज घाट दरवर्षीप्रमाणे यंदाच्याही वर्षी माळशेजघाटात
कार्यकर्ता मेळावा व स्नेह भोजनाचे आयोजन केले होते.यावेळी पत्रकारांनी
अलीकडे काहींनी निवडणूक लढणार म्हणून सांगितले त्यानुसार आपले मत काय ऋ यावर आमदार
श्री.कथोरे यांनी निवडणूक लागल्यावर कोणाचेही आव्हाण मी स्विकारेल
असे म्हणत खोचक चिमटेचा टोला आपल्या राजकीय विरोधकांना मारला आहे.यावेळी कार्यकते यांच्याशी संवाद साधत मतदारांत आणलेल्या भरघोस निधीसह केलेली
विकासकामे व नविन प्रकल्प पाहोचवण्याचा सल्ला दिला.अनेकांनी मी
या पक्षात जार्इ मी त्या पक्षात जार्इल असे वावडया काहींनी उठवल्या होत्या परंतु मी
भारतीय जनता पार्टी पक्षाशी प्रामाणिक आणि एकनिष्ठ आहे की मी या पक्षात समाधानी आहे.मी कोणत्याही पक्षात जाणार नसुन खोटया अफवा पसरवुन माझ्या कार्यकर्तांमध्ये
संभ्रम निर्माण केला जात आहे,कोणीही त्या संभ्रमांत अडकू नका
विरोधकांचे हेच तर काम आता करणे बाकी आहे.इथं कोणीही कितीही उडया
मारल्या तरी कुकरमध्ये डाळ शिजणार नाही हे त्यांनी लक्षात घ्यावे असे आवाहनच रोखठोक
भूमिकेत आमदार किसनराव कथोरे यांनी केले आहे.
त्यामुळे
आमदार किसनराव कथोरे यांना निवडणूकीत पाडायची ताकद
कोणामध्येच नाही कारण जनताच त्यांची ताकद असून जनतेच्या मनातील
आमदार किसन कथोरे नावाच्या व्यक्तीमत्वाची छबी कोणीही पुसवु शकणार नाही अशी चर्चा आता
नाक्या नाक्यावर होत आहेत.विरोधकांनी साहेबांचे कितीही नाव बदनाम
करण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्यातुन अजुन आमचे साहेबांचे कार्य उजळून येतील हे लक्षा
असुद्दया,अशा प्रतिक्रिया यावेळी समर्थक,कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून मिळत आहेत.
Post a Comment