BIG BREAKING NEWS...

आमदार किसन कथोरे कुणबी समाजाचे कणखर नेते ; मंत्री पदापासून डावलल्याने कुणबी समाजात नाराजी (भाग क्र.1)

 

(दि.24,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

कोकणातील आधारवड विकासाचे झंझावात म्हणून सदैव कार्यसम्राट आमदार म्हणून चर्चेत असलेले कुणबी समाजातून जन्म घेऊन अखंड कोकणाच्या विकासाचे विचार करणारे विकासपुरूष आमदार किसन कथोरे यांनी सरपंच सभापती पासून आपली सुरूवात केली अन अंबरनाथ विधानसभेतून प्रथम आमदार म्हणून ते निवडून आले.याच कोकणाचे भाग्यविधाते नेत्यांनी आपल्या विकासाची रणनिती केवळ अंबरनाथ पुरते मर्यादीत न ठेवता बदलापूर तेथून कल्याण ग्रामीण नंतर मुरबाड,शहापूर यांसह संपूर्ण ठाणे जिल्हयात पसरविली.आज कुणबी समाजाचे नेते म्हणूण समाज जागरूक नेता म्हणून आमदार श्री.कथोरे यांच्याकडे पाहिले जाते.त्यानंतर विकासाची गती कमी न होता झपाटयाने वाढली.आज मुंबर्इसह पालघर,ठाणे जिल्हयाच्या सबंध कोकणात कुणबी समाज हा एकवटलेला असून याच कुणबी समाजाचा मौल्यवान चमकणारा कोहिनूर ठरलेले आमदार किसन कथोरे यांनी समाजाबरोबर सर्वच घटकांतील जनमानसात पोहोचुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.मायभूमी जरी बदलापूर असले तरी कोकणात कार्यभूमी आमदार श्री.कथोरे यांची नाकारता येणार नाही.सन 2009 सालापासून आमदार असलेले ते सन 2024 च्या निवडणूकीतही 53 हजाराच्या लीड ने आमदार म्हणून निवडून आलेले श्री.कथोरे यांनी सलग 5 वेळा आमदारकीची हॅट्रिक पार केली आहे.सन 2019 सालात तर कुणबी समाजाचाच चेहरा हा महाराष्ट्रात सर्वाधिक मते घेऊन तिसरे क्रमांकाच्या स्थानी होता.अंबरनाथमधून 1 वेळा नंतर रचनेत बदल झाला अन मुरबाड विधानसभा मतदार संघ निर्माण झाला.याच मुरबाड विधानसभा मतदार संघातून सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून आले.दमदार असलेले आमदार दुसरा कोणी होणार नसून स्व.शांतारामभाऊ घोलप साहेब यांच्या नंतर ठाणे जिल्हयाच्या ग्रामीण भागाला अर्थात तरी कुणबी समाजाला मंत्री पद मिळाले नसल्याने त्यानंतर कुणबी समाजाचा ढाण्या वाघ म्हणून आमदार किसन कथोरे यांचा चेहरा आहे तरी देखील कुणबी समाजाला नेहमी प्रमाणे यंदाही मंत्रीपदापासून वंचित ठेवण्यात आले आहे.अर्थात आमदार श्री.कथोरे यांनी कधीच जातीपातीचा राजकारण केलं नाही,काही जणांनी जरी आरोप केले असले तरी सर्वच घटकांतील जनमानसांना आमदार श्री.कथोरे यांच्या राजकारणासह समाजकारणाचे चांगलेच ज्ञान आहे त्यामुळे काही जण वेगवेगळे मॅसेज सुध्दा पसरविण्याचा प्रयत्न केले असल्याची शंका असू शकते.आज आमदार किसन कथोरे यांना मंत्री मंडळात स्थान मिळणं कुणबी समाजाला अपेक्षित होते असे असताना समाजाच्या अपेक्षा मोडकळीस आणण्यामध्ये अदृश्य शक्ती असल्याचे बोलले जात आहे.ठाणे जिल्हयाच्या ग्रामीण भागाच्या वाटेला कुणबी समाजाचे नेते यांची देखील हिच इच्छा होती कि आमदार श्री.कथोरे यांना मंत्री पद मिळावे परंतु तसे घडले नसल्याने कुणबी समाजात नाराजीचा सुर उमटत आहेत.आगामी महानगरपालिका,नगरपालिका निवडणूका असल्याने कुणबी समाज या आगामी निवडणूकीत नाराजीचा फटका संबंधित उमेदवाराला मतदानाने देऊ शकतो.कुणबी समाजाचे कर्तृत्वान,कोकणाचे आधारस्तंभ आमदार किसन कथोरे असल्याने कुणबी समाजाच्या ठाणे जिल्हयाच्या ग्रामीण वाटेला मंत्री पद डावळण्याचा प्रयत्न जो करण्यात आला आहे त्यामुळे कुणबी समाजाची नाराजी कितपत आहे हे देखील आगामी निवडणूकीतून समोर येर्इल.जर विरोधकच कुणबी उमेदवार उभा राहिला तर कुणबी समाज सत्ताधारी यांच्या उमेदवाराला पराभूत करू शकतो हे नाकारता येणार नाही.(क्रमशः)(उर्वरित पुढील भागात)

Post a Comment

Previous Post Next Post