(दि.31,POL
- कुणाल शेलार,मुरबाड)
कोकणातील आधारवड
विकासाचे झंझावात कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांनी सर्वच घटकांतील जनसामान्यातील
गळयातील तार्इत झाले असून त्यांना माणनारा जनसमुदाय समुद्राच्या सागराहुनी अलोट गर्दीने
दरवर्षी त्यांना दिर्घायुष्य लाभो म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी
उपस्थित असतो.याच जनसमुदायांनी त्यांच्यावर जे प्रेम बहाल केले आहेत त्याची कमालगिरी ही
जादुगिरीतुन मताधिक्याने वाढली आहे.निवडून येतांना कधी
10 किंवा 15 हजाराचा लिड खाली न जाता चक्क
50 हजाराच्यावरच गेला असल्याने एक खंबीर आमदार जनकैवारी म्हणून सर्वांचा
पाठिशी ठामपणे राहिले आहेत.आज मुरबाड विधानसभेकडे पाहिले तर रस्ते
काँक्रेटिकरण झाले,गरजूंना पहिले घरकूले मिळत नव्हती पुन्हा पुन्हा
त्यांनाच घरकूले मिळायचे परंतु त्याची खोड आमदार श्री.कथोरे यांनी
मुळापासून उपटून काढली अन खरा गरजू जो आहे त्याला घरकूले मिळवून दिली.बदल झाला तो विकासकमात.मुरबाड तालुक्यात सन
2009 सालात सर्वप्रथम आमदार श्री.कथोरे यांनी पाय
ठेवले तेव्हा पाण्याच्या संकटाची बिकट अवस्था होती.डोक्यावरील
हंडा खाली येत नव्हता,गडुळाचे पाणी डबक्यातून गाळून पियावे लागत
होते परंतु आमदार श्री.कथोरे यांनी जातीने लक्ष घालून पाण्याची
समस्या दुर केली.गडुळाचे पाणी न मिळता जनतेला फिळटराचे पाणी आज
पियाला मिळत आहेत.इतकेच नव्हे तर विकासनिधी भरमसाठ या विधानसभेमध्ये
आणून कायापालट करून टाकली.अनेकांनी टिका टिपण्णी केली परंतु त्याकडे
लक्ष न वेधता माणूसकी धर्मातून जनतेची सेवा आमदार श्री.कथोरे
हे करितच राहिले.समाजाला त्यांच्याकडून प्रेरणा मिळत गेल्याने
अनेकांनी आमदार श्री.कथोरे तिथंच आम्ही अशी भूमिका स्विकारली.त्यामुळे आज आमदारांची सैनिकांची फळी हजाराहुन लाखोंवर गेली आहे.आमदार श्री.कथोरे सेनापती ठरले व बालेकिल्ल्यातील सैनिक
सावली ठरले आहेत.पक्षवाढीबरोबर विकासकामांत त्यांचे हात कोणी
पकडू शकत नाही.त्यांच्या जनता दरबारात आजही गर्दी ही कमी न होता
वाढली आहे.असे असताना अनेक समाजांना एकत्र घेऊन कुणबी समाजाचा
कणखर नेता म्हणून यावेळीही त्यांना जाहिर पाठिंबा देऊन 5 व्यांदा
आमदार केलं,संभाव्य आमदार म्हणून त्यांचे नाव चर्चेत असतांना
ठाणे जिल्हयाच्या ग्रामीण भागाला पुन्हा मंत्री पद येणार असल्याचा आनंद जणू संपूर्ण
विधानसभेला झाला आणि घटक्यात अदृश्य शक्तीने तो आनंद हिरावून घेतला आणि आमदार किसन
कथोरे यांना मंत्री पदापासून डावललण्यात आलं.आनंदाची चादर अश्रुंच्या
धारेत बदलली अन पुन्हा तेच घडले जे अदृश्य शक्तीला हव होतं.आमदार
श्री.कथोरे यांना मंत्री पद न दिल्याने सर्वच घटकांसह कुणबी समाजात
नाराजी पसरली.सर्वात जास्त अन्याय ठाणे जिल्हयाच्या कुणबी समाजावर
करण्यात आल्याने कुणबी समाजाची नाराजी पक्ष श्रेष्ठींनी अद्दयापही दुर केलीली नाही.आमदार श्री.कथोरे यांच्याशी संपर्क अद्दयापतरी होऊ शकला
नसून कुणबी समाजावर केलेला अन्याय त्यांना मान्य आहे की नाही याचं उत्तर त्यांच्याकडून
लवकरच मिळेल या अपेक्षेत सर्वच कुणबी बांधव आहेत. (क्रमशः)(उर्वरित पुढील भागात)
Post a Comment