दि,28,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
जिल्हा नियोजन समिती ही
विकासनिधीची चावी असल्याने विकास कामांकरिता लागणारा कोटयावधीचा निधी येथूनच रितसर
पध्दतीने उपलब्ध करून दिला जात असतो. या निधीतून विकासकामांत दरवर्षी कोटयावधी रूपयाचा
निधी संबंधित विभागांच्या कार्यक्षेत्रातील असलेल्या कामांना दिला असल्याने विकासाची
गती झपाटयाने वाढली आहे.लोकप्रतिनिधी यांच्या मागणीनुसार प्रशासकिय मान्यता देऊन निधी
वितरीत केला जात असून आज ग्रामीण भागाचा विकास जोर धरू लागला आहे.जिल्ह्यातील शिक्षण,कृषी,आरोग्य,वाहतूक,शासन
योजना यांसारख्या विविध विषय मार्गी लागत असल्याचे निदर्शनास येत आहे.
जिल्ह्यातील
विविध विकासकामे मार्गी लावण्याच्या नियोजनात महत्वाची भूमिका प्रशासनाच्या जिल्हा
नियोजन विभागाची असते. यामाध्यमातून जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था, कृषी विभाग, आरोग्य
विभाग, शिक्षण व्यवस्था तसेच अनेक पायभूत सुविधांची उभारणी यांसारख्या महत्वाच्या विषयांवर
जिल्हा नियोजन विभागाच्या माध्यमातून विकासकामे होत असतात.यामध्ये जिल्ह्यातील सर्व
आमदार आणि खासदार त्यांच्या मतदारसंघातील विविध प्रलंबित विषय,नवीन विकासकामे याबाबत
जिल्हा प्रशासनाला अवगत करून जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून ही सर्व कामे मार्गी
लावण्यासाठीच्या सूचना देण्यात येत असतात.त्यामुळे जिल्हा विकासाच्या दृष्टीने जिल्हा
नियोजन समिती हे महत्वपूर्ण भाग विकासकामांना भर घालण्याकरिता कार्यरत आहे.ठाणे जिल्हा
नियोजन समिती कार्यालयात अशीच विकासकामे गेली असता उपलब्ध निधीतून अवश्यक ठिकाणी निधी
हा तात्काळ दिला जात असल्याने विकासाला एक चांगली दिशा मिळत आहे.ठाणे जिल्हा नियोजन
समितीचे श्री.वैभव कुलकर्णी यांचे दालनात येणार्या व्यक्तीला मान सन्मान दिले जाते.प्रत्येक
व्यक्तीचं समाधान करणारे अधिकारीतुन माणुसकी झरी जपणारे ठाणे जिल्हा नियोजन समितीचे
श्री.वैभव कुलकर्णी यांचे प्रत्येक विकासाकामावर त्याचबरोबर प्रलंबित असलेल्या कामांना
जलदगतीने व जबाबदारी तात्काळ मार्गी लावून निधी कशा पध्दतीने उपलब्ध करून देता येईल
यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत.ठाणे जिल्हा नियोजन समिती कार्यालयात विकासात्मक कामे
होण्याकडे बारकाईने लक्ष वेधले जाते.आमदार,खासदार यांच्या मागणीनुसार उपलब्ध निधीतून
विकासकामांना निधी वितरीत होत असताना लोकप्रतिनिधी यांच्या विकासाच्या गतीत सिंहाचा
वाटा हा जिल्हा नियोजन समिती कार्यालयाचा असल्याने ते नाकारता येणार नाही.या कार्यालयातून
अधिकारी वर्ग अतिशय शिस्तीबध्दाने व निस्वार्थपणे आपले काम करतांना दिसले आहेत.चांगलं
चालत असताना काहींना चांगलं खटकतो त्यावर दबावतंत्राच्या सहाय्याने ब्लॅकमेलर तयार
होतात परंतु अशांना न नमता आपले काम जिल्हा नियोजन समिती ठाणे कार्यालयातील सर्वच अधिकारी
कर्मचारी वर्ग चोखपणे करत आहेत.आरोग्याचे दृष्टिकोण डोळयासमोर ठेवले असता प्रथम प्राधान्य
जिल्हा नियोजन समिती ठाणे यांचेकडून देण्यात येत असते यामुळे विविध शासकीय योजना,लाभार्थी
यांना याचा फायदा होत आहे.इतकच नव्हे तर विकासाची गती वाढविण्यासाठी कधी कधी सुट्टीच्या
दिवशीही अधिकारी कर्मचारी वर्ग कार्यरत असतात.आजपर्यंत कामासाठी येणारे कधी चांगल्या
बाबींच्या चार ओळीचा लेखाजोखा मांडीत नाही याची खंत काहींना वाटत असेल परंतु इथं माझं
काम झालं की मला काही देणं घेणं नाही अशीही व्यक्तीमत्व असतीलच परंतु याकडे लक्ष न
वेधता आपल्या कर्तव्यावर असलेल्या अधिकारी कर्मचारी वर्गाचे जेवढं कौतुक करावं तेवढं
कमीच आहे.
Post a Comment