दि,01,POL,कुणाल शेलार,मुरबाड -
अनेकांच्या विविध स्वरूपाच्या
तक्रारी आज स्थानिक पातळी ते जिल्हा तसेच राज्य पातळीवर असतात.कोणी भ्रष्टाचाराची तक्रार
करतो,कोणी न्याय मिळावा म्हणून तक्रार करतो तर कोणी कायद्दयाचे अटी नियमांचे पालन न
करता हाताशी धरून खेळ करतो यांसह अन्य तक्रारीचे गठोरी प्रशासकांकडे जातात.कधी कधी
तर पुरावे असताना पळवा पळवी तक्रारदाराला पाठीराखे झालेले करण्यास भाग पाडतात तरीही
तक्रारदार पाठपुरावा करतो परंतु अलीकडे तक्रारदाराची दखल पुरावे असतानाही घेतली जात
नाही त्यामुळे कुंपनच शेत खातंय का ? असाही प्रश्न आज तक्रारदाराला पडू लागला आहे.वरिष्ठ
अधिकारी यांच्याकडे एखादी तक्रार गेली की कारवाई होत नाही,बचाव सत्र करणारी संगणमती
प्रकार कळून येते,त्यामुळे अनेक तक्रारदार उपोषणे,मोर्चे आंदोलने काढतो.त्यावर राज्यस्तरावरून
तक्रारदाराला परावृत्त करण्याचे पत्र काढले जाते.ती तक्रार तर नोंद होते परंतु कारवाई
केली जात नाही.कधी कधी तर राजकीय आधार असल्याने तक्रारदाराच्या तक्रारीची होडी केली
जाते.प्रशासकावरील विश्वास असताना तक्रारदाराला फेरफटका माराव्या लागतात.काही जण तर
स्वतःच तक्रार करण्यास सांगत असतील व सेटलमेंट पध्दत वापरून बचाव करत असतील असे जणू
आज वाटु लागले आहे.त्यामुळे आंदळ दळतंय अन कुत्र पीठ खातंय अशीच म्हणायची वेळ आली आहे.
Post a Comment