दि,07,POL,मुरबाड -
गेल्या 1 वर्षापूर्वी
ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यातील कळमखांडे गावातील शेतकरी श्री.विजय पांडूरंग कापडी
यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत असताना अचानक नजरचूकीने सदर योजना केंद्र शासनाला
सरेंडर झाली होती.कालांतराने सदर योजेनेचे पैसे आपल्याला पडत नसल्याने याबाबत माहिती
घेतली असता सदर योजना सरेंडर झाल्याने पैसे मिळणं बांद झाल्याचे कळून आले याबाबत संबंधित
विभाग अधिकारी यांना पत्रव्यवहार करून नजरचुकीने बंद झालेली योजना पुन्हा सुरळीत चालु
करावी अशी विनंती केली होती परंतु त्या पत्रावर कोणताही अभिप्राय दिला नसल्याने विचारपूस
करूनही योजना सुरळीत चालु करण्यासाठी दिरंगाई केली.याबाबत सविस्तर वृत्त पत्रकार
कुणाल शेलार व पत्रकार संदिप गायकर यांना सांगितल्याने त्यावर सर्व प्रकारचे शासकीय
परिपत्रक काढून अभ्यास केले व थेट महाराष्ट्र सरकार,भारत सरकार यांच्याकडे तक्रार केली
त्यावरही तोडगा न काढता उडवा उडवीची उत्तरे दिली अखेर पत्रकार कुणाल शेलार व पत्रकार
संदिप गायकर यांनी या योजनेचा लाभ पुन्हा मिळावे म्हणून मंत्रालयाच्या दालनासमोर उपोषण
करून न्याय मिळवून देण्याचा लोकशाही मार्गाने प्रयत्न केला त्यावर पोलीस ठाण्यातही
जबाब नोंद झाला.वरिष्ठांकडून तालुका स्तरावरील हालचालीला वेग आला अन कालांतराने उपोषण
स्थगित करावे म्हणून अर्जदाराच्या वतीने उपोषणकर्त्यांच्या यांच्या भेटीला अधिकारी
घरी जाऊन भेट घेतली व त्यानंतर पत्र देऊन तात्पुर्ते उपोषण थांबवून यावर आयुक्त यांना
याबाबत मार्गदर्शन करण्याचे कळविले आहे असे सांगितले अखेर सदर उपोषणाच्या मागणीचा प्रथमच
असा मुद्दा संपुर्ण महाराष्ट्रात गाजला.सदर विषय पत्रकार कुणाल शेलार व पत्रकार संदिप
गायकर यांनी भारत सरकारच्या लक्षात आणून दिले असता अखेर पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर
व्हॉलेंटरी सरेंडर ऑप्शन टाकण्यात आले.या ऑप्शननी केवळ एका विजय कापडी याच शेतकर्यालाच
न्याय मिळाला असे नसून ज्यांची योजना बंद झाली असेल त्यांनाही आता ही योजना पुर्वरत
म्हणून पुन्हा चालु होणार आहे.याबाबत सदर माहिती कार्यसम्राट आमदार किसनराव कथोरे यांना
भेट घेऊन सांगितली असता त्यांनी याबाबत आपण तात्काळ लक्ष वेधून राज्य सरकारशी बोलून
यावर तोडगा काढण्यासाठी आश्वासन दिल्याने आमदार श्री.कथोरे व उपोषणकर्ते यांच्या पाठपुराव्यामुळे
या योजनाला नवी चालना मिळून नजरचूकीने झालेल्या अपात्र शेतकरी बांधवांना आता पुन्हा
पीएम किसान योजनेचा लाभ सुरळीत मिळणार असून याचा लाभ केवळ महाराष्ट्रात नसून तर संपुर्ण
देशभर अपात्र असलेल्या शेतकरी बांधवांना मिळणार आहे आणि हे इतिहासात नोंद होणारा विषय
ठरेल यात शंका नसून विजय पांडूरंग कापडी व सर्व शेतकरी बांधवांनी आमदार किसन कथोरे
व पत्रकार कुणाल शेलार व पत्रकार संदिप गायकर यांचे आभार मानले आहेत.
Post a Comment