BIG BREAKING NEWS...

आमदार किसनराव कथोरे यांचे एकनिष्ठेचे दिलखुलास व्यक्तीमत्व स्वीयं सहाय्यक श्री.जालिंदर सावंत...

 

(दि.27,POL - कुणाल शेलार,मुरबाड)

महाराष्ट्राचे लाडके कार्यसम्राट आमदार तथा मुरबाड विधानसभेचे ढाण्या वाघ आमदार किसनराव कथोरे यांच्या विकासकार्याची तुलना कोणीही त्यांच्या बरोबरीने करू शकत नाही असा कोकणासह ठाणे जिल्हयात तसेच मुरबाड विधानसभेत विकासमेरू म्हणून कायापालट झाला आहे.गोरगरिबांची अडीअडचण दुर करण्यासाठी अहोरात्र डोळयात निरंजन घालून आमदार श्री.कथोरे यांनी सदैव प्रयत्न केले आहे.अनेक श्री.कथोरे साहेबांच्या अत्यंत जवळचे आहेत त्यापैकी साहेबांची सावली म्हणून एकनिष्ठेतेचे दिलखुलास व्यक्तीमत्व म्हणून स्वीयं सहाय्यक जालिंदर सावंत आहेत.

आमदार श्री.किसनराव कथोरे यांच्या येथे भरल्या जाणार्‍या जनता दरबारात अनेक ठिकाणावरून विविध प्रकारचे समस्या नागरिक घेऊन येत असतात.कधी प्रशासकीय बाब तर कधी शिक्षण,आरोग्य,आर्थिक अडचणी,शासकीय योजना,पाणी प्रश्‍न,गावातील तंटा,यांसह अन्य समस्या असून आमदार श्री.कथोरे साहेब जागेवरच सोडवित असताना त्याक्षणी साहेबांचा एक आवाज येतो सावंत दादा यांना दिलेलासदर विषय घे आणि मार्गी लाव.त्यामुळे तात्काळ विषयाला पुर्णविराम दिले जात असल्याने प्रत्येक नागरिकांना दिलासा या जनता दरबारातुन मिळाला आहे.सामाजिक बांधिलकी बरोबर माणूसकी झरी जपणारे विशाल समुद्रावाणी अथंग महासागरासारखे दिलदार व्यक्तीमत्व आमदार श्री.कथोरे यांचे स्वीयं सहाय्यक श्री.जालिंदर सावंत यांच्याकडून जनतेची कामे जलदगतीने होतांना दिसली आहे.

प्रत्येक बाबींची घडामोडी स्वीयं सहाय्यक श्री.जालिंदर सावंत घेत असून त्याची कल्पना साहेबांपर्यंत पोहोचवली जाते.साहेबांचे शिफारसाने गरिबांचे कामे होत असल्याने तात्काळ त्याबाबत साहेबांना शिफारसपत्राबाबत कळवून मदतीचा हात दिला गेला आहे.असंख्य कामांची नोंद स्वीयं सहाय्यक श्री.जालिंदर सावंत हे दैनंदिनात घेऊन रखडलेल्या जनतेच्या कामांचा पाठपुरावा घेऊन त्यांचे प्रश्‍न मार्गी लावण्यात यशस्वी झाले असल्याने आमदार साहेबांच्या जनता दरबारात साहेबांसह स्वीयं सहाय्यक श्री.सावंत यांचे नागरिकांनी आभार मानले आहे.या जनता दरबारात आमदार श्री.किसनराव कथोरे साहेब नागरिकांचे समस्या जाणून घेण्याकरिता सकाळीच उपस्थित असल्याने याच दरबारात साहेबांची सावली स्वीयं सहाय्यक श्री.जालिंदर सावंत हे देखील आपल्या कर्तृत्वावर तत्पर असतात त्यामुळे अनेक ठिकाणावरून आलेल्या समस्यांचा न्यायनिवाडा लगेचच होत असल्याने या जनता दरबारात लोकसंख्यांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

येथे येणारा प्रत्येक व्यक्ती मग तो युवा,महिला भगीनी,ज्येष्ठ,सामाजिक कार्यकर्ता अन्य कोणीही असो तो खाली हात माघारी जात नाही,प्रामुख्याने सांगायचे झाले तर त्या जनतेला रिकाम्या हाती पाठविलेच जात नाही.आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे समाधान साहेबांच्या दालनात होत असल्याने साहेबांच्या आदेशाचे पालन संबंधित विभागांना करावे लागत असल्याने त्याबाबत मात्र पाठपुरावा आमदार किसनराव कथोरे यांचे एकनिष्ठेतेचे दिलखुलास व्यक्तीमत्व,नियोजनबध्द आणि कटिबध्द असलेले स्वीयं सहाय्यक श्री.जालिंदर सावंत करित असल्याने असे व्यक्तीमत्व दुसरे होणं नाही अशी चर्चा आता नागरिकांमध्ये होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post