BIG BREAKING NEWS...

समाज कल्याण न्यास च्या वतीने ठाणे,पालघर जिल्ह्यातील 5000 महिला भगिनींना भाऊबीज भेट...

दि.28,-POL, मुरबाड -

समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, धर्म सेवक डॉ.श्री. सोन्या काशिनाथ पाटील यांच्या माध्यमातून गेल्या 30 वर्षापासून अखंडितपणे ठाणे, पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिला भगिनींना साडी व मिठाई तर  त्यांच्या मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करत आले आहेत.

याचाच एक भाग म्हणून यावर्षी देखील शुक्रवार दिनांक 25 ऑक्टोबर 2024 ते सोमवार दिनांक 28 ऑक्टोबर 2024 या कालावधीत पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड, खोडाला, जव्हार, मोखाडा, या तालुक्यातील आदिवासी भागामध्ये तर ठाणे जिल्ह्यातील शहापूर, कसारा, डोळखांब, मालशेज घाट, मुरबाड या तालुक्यातील आदिवासी  वाड्या,वस्त्यांमध्ये तसेच धसई-कातकरी वाडी- माणगाव या पाड्यांमध्ये आदिवासी महिलांना समाज कल्याण न्यास तर्फे मिठाई व साडी भाऊबीज भेट देऊन त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली.  

 

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी उर्फ दादुस हे ठरले त्यांनी आपल्या गाण्याच्या तालावर सर्व आदिवासी महिला भगिनींना गाण्याचा ठेका धरून नाचायला लावले. त्यामुळे सर्व आदिवासी महिला भगिनी आनंदी झाल्या व त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आज जगातून माणुसकी हरवत चाललेली आहे प्रत्येकाने माणुसकी जपली पाहिजे माणुसकी जपण्यातच खरं सुख आहे इतरांच्या आनंदातच आपला आनंद शोधणे तळागाळातील लोकांना मदत करणे त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवणे, आनंदाचे क्षण सर्वांन सोबत साजरी करणे, आपण आनंदी तर आहोतच पण आपल्यामुळे इतरही कसे आनंदी राहतील यासाठी समाज कल्याण न्यास चे संस्थापक अध्यक्ष डॉ.श्री. सोन्या काशिनाथ पाटील सतत प्रयत्नशील असतात. प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व सर्व उपस्थित महिला भगिनींनी दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. 

          एक विशेष बाब म्हणजे रस्त्याने जाताना ज्या महिला  रस्त्याने प्रवास करतात किंवा शेतात काम करतात अशा महिलांना गाडी थांबवून त्यांच्याजवळ जाऊन त्यांना रस्त्यातच भाऊबीज भेट देऊन त्यांना आनंदी करत असतात.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.श्री. सोन्या काशिनाथ पाटील संस्थापक अध्यक्ष समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य, डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील संपादक दैनिक स्वराज्य तोरण, ,श्री.संतोष चौधरी उर्फ दादुस बिग बॉस फेम तथा प्रसिद्ध गायक ,डॉ.श्री.मनीलाल रतिलाल शिंपी आर एस पी कमांडर  तथा ठाणे,पालघर नाशिक  विभागिय समादेशक,श्रीमती स्वाती कांबळे महिला अध्यक्ष श्रीमती. शिल्पा टाकळकर समाजसेविका,श्री. ज्ञानेश्वर भोईर जिल्हाध्यक्ष समाज कल्याण न्यास, श्री राजेंद्र काबाडी ज्येष्ठ समाजसेवक,श्री. प्रितेश सोन्या पाटील युवा अध्यक्ष समाज कल्याण न्यास महाराष्ट्र राज्य,श्री. जयवंत काशिनाथ पाटील कार्याध्यक्ष,समाज कल्याण न्यास,श्री. जावळे गुरुजी समाज कल्याण न्यास ,श्री. स्वप्निल भोईर ठाणे जिल्हा उपाध्यक्ष समाज कल्याण न्यास,श्री.विकी पाटील भिवंडी तालुका अध्यक्ष समाज कल्याण न्यास, श्री. विशाल पाटील कार्यकारी सदस्य समाज कल्याण न्यास, श्री.नामदेव कडव सरपंच मानिवली, श्री. अजित इसामे मुरबाड तालुकाध्यक्ष समाज कल्याण न्यास, ॲड.शुभांगी निचिते सदस्य समाज कल्याण न्यास,मनिषा निचिते सदस्य समाज कल्याण न्यास, श्री.रमेश विशे, श्री.सुचित भेरे आदी मान्यवर , सर्व सन्माननीय पदाधिकारी सदस्य व समाज कल्याण न्यासचे कार्यकर्ते तसेच तसेच प्रत्येक तालुक्याच्या परिसरातील अनेक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.शुभांगी निचिते यांनी केले.तर आभार प्रदर्शन ठाणे जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोईर यांनी केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज कल्याण न्यास च्या सर्व पदाधिकारी व सभासदांनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post